वर्धापन दिनानंतर ठाकरेंना मुंबईत पहिला मोठा धक्का! दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

वर्धापन दिनानंतर ठाकरेंना मुंबईत पहिला मोठा धक्का! दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Two former corporators of Uddhav Thackeray Party Join BJP : शिवसेना उबाठा गटाचे (Uddhav Thackeray) माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar) त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष (Mumbai Politics) कमलाकर दळवी उपस्थितीत होते.

यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे, लवकरच दुसरा आणि तिसरा आणि शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल.

राजकोट किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांसाठी पुन्हा बंदी; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दीड महिन्यापूर्वीच झालं होत अनावरण

उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या. आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर एकचा पक्ष झालाय.

वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली; रुग्णालयात न घेऊन जाता तुरुंगातच उपचार

मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला. आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

आगामी काळात लवकरच मोठे पक्षप्रवेश होणार आहेत, असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. तार्किकदृष्टया आम्ही आता मुंबईत सर्वांधिक नगरसेवक असलेला पक्ष झालो आहे.
मनसेच्या बॅनरवर मी उद्या स्पष्ट भूमिका मांडणार आहे. आदित्य ठाकरे यांनी खोटे बोलण्याचा चष्मा घातला आहे. उबाठा गटाने आत्मपरिक्षण करावे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube